जामनेर : प्रतिनिधी
शहरात एकाच दिवसात शालेय मुलींना पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. महिलेच्या वेशातील एका पुरुषाने आपली कॉलर पकडून नाकाला रूमाल लावण्याचा प्रयत्न केला. पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत जामनेर पोलिसाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
शहरातील इंदिराबाई ललवाणी विद्यालयाजवळ बुधवारी दुपारी जामनेरपुऱ्यातील पाचवीच्या विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटणा घडली. अपहरणकर्त्याने विद्यार्थिनीच्या नाकाला रुमाल लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थिनीने त्याच्या हाताला चावा घेत स्वत:ची सुटका करुन घेतली. तर दुसऱ्या घटनेत अपेरिक्षात आलेल्या तीन अनोळखी महिलांनी अन्य दोन विद्यार्थिनींना जवळ बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही विद्यार्थिनींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पळ काढल्याने अनर्थ टळला.
भुसावळ रस्त्यात उभ्या असलेल्या रिक्षातील दोन साडीधरी पुरुषांनी दोन विद्यार्थीनींना जवळ बोलावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अॅपेरिक्षात दोन लहान मुले झोपलेली होती, असे या विद्यार्थीनींनी सांगितले. शाळेत प्रवेश करण्यापूर्वी महिलेच्या वेशातील एका पुरुषाने आपली कॉलर पकडून नाकाला रूमाल लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी त्याच्या हाताला चावा घेत शाळेकडे पळाल्याचे संबंधित विद्यार्थिनीने सांगितले. याबाबत माहिती मिळताच तत्काळ संस्थेचे सचिव किशोर महाजन यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी परिसर पिंजून काढला, मात्र महिला आढळल्या नाहीत. असे असले तरी पोलिसांकडे लेखी तक्रार करण्यात आला आहे.
भुसावळ रस्त्यावर साडीतील दोन आणि गाऊन परिधान केलेली एक, अशा तीन साडीधारी पुरुष अॅपेरिक्षाजवळ उभ्या होत्या. त्यांनी इतर दोन विद्यार्थिनींना जवळ बोलावले. मात्र विद्यार्थिनींच्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शाळेची वाट धरल्याचे दोन्ही विद्यार्थीनींनी सांगितले. या रस्त्यावरून शाळेकडे जात असलेल्या एका मुलीला त्यांनी बळजबरीने सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याचे देखील कळते. हा प्रकार विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक जे.पी.पाटील यांना मुख्याध्यापकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी संबंध परिसर पिंजून काढला, मात्र महिला कुठेही दिसून आल्या नाहीत.