जळगाव मिरर | ३१ जानेवारी २०२४
मेव्हाण्यासोबत जेवणाला जाण्यासाठी निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव कारने कट मारला. दुचाकी घसरत जावून दुभाजकाला धडकल्याने गणेश प्रकाश पाटील यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील पांडूरंग नगरात नागराज आमले हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. गणेश पाटील यांचा मावस शालक आशाबाबा नगरात वास्तव्यास होता. दि. २३ जानेवारी रोजी रात्री शालकासोबत जेवणासाठी खोटेनगरातील हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघाले. यावेळी त्या दोघांनी वेगवेगळ्या दुचाकी घेतल्या होत्या. गणेश पाटील यांच्या (एमएच १९ बीएन ८३९०) क्रमांकाच्या दुचाकीला (एमएच ०८ आर ६१०६) क्रमांकाच्या कारने महामार्गावरील हेरंब नेत्रालयासमोर कट मारला. गणेश पाटील यांची दुचाकी घसरुन ती दुभाजकाला धडकली. यामध्ये गणेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला.