जळगाव : प्रतिनिधी
शहरातील खोटे नगरातील रहिवासी ३७ वर्षीय तरुणाचा मृतदेह भुसावळ तालुक्यातील अंजाळे शिवारातील तापी नदीच्या पात्रात आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील खोटे नगरातील रहिवासी दीपक दिनकर भारंबे (वय ३७) हे आपल्या मूळ गावी पाडळसे कामानिमित्त गेले होते. त्यांचा मृतदेह अंजाळे शिवारातील तापी नदीच्या पात्रात काट्यांच्या झुळपात आढळून आल्याची घटना निदर्शनास आली. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा प्रकार तो नदीत बुडाला की आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. यावल पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहेत.