जळगाव मिरर | १३ जुलै २०२३
देशात गेल्या काही वर्षापासून आपल्या अद्भुत सत्सगामधून लाखो अनुयायीच्या मनात असलेल्या घटना बाहेर काढून त्याच्यावर उपचार सांगणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांची श्रीमद भागवत कथा 10 जुलैपासून ग्रेटर नोएडा येथे सुरू आहे. ही कथा 16 जुलैपर्यंत चालणार आहे. 12 जुलै बुधवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बाबा बागेश्वर यांच्या दिव्य दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
लाखो भाविक बाबांच्या दरबारात पोहोचले. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी दुपारी 12 वाजता मंचावर पोहोचून लोकांची अर्जी स्वीकारण्यास सुरुवात केली. सगळ्यात आधी फॉर्म तयार करताना बाबांनी सांगितले की आधी स्वातीची अर्जी भरली आहे. लहान मुलाला घेऊन पंडालच्या मध्यभागी बसून स्वाती बाबांच्या दरबारात पोहोचली. स्वाती तिच्या समस्या सांगायच्या आधीच बाबांनी तिच्या समस्या एका कागदावर लिहून ठेवल्या होत्या. बाबांनी स्वातीच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावरचे उपायही सांगितले. त्यानंतर दुसऱ्या अर्जीसाठी आलेल्या भक्ताला बोलावण्यात आले. बाबांनी सांगितले की, महिलेची मुलगी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. ती आपल्या मुलीसोबत बसली आहे. जेव्हा ती महिला आपल्या मुलीला घेऊन बाबांकडे पोहोचली तेव्हा बाबांनी सांगितले की लहानपणापासूनच मुल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. हे ऐकून ती महिला रडू लागली