जळगाव मिरर | ६ मे २०२३
सध्या प्रत्येक मुलीकडे मोबाईल आल्याने सातत्याने मुलगी अनेक सोशल मिडीयावर सक्रीय असल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या मुलींची फसवणूक होते तर काही वेळीच सावध होत दूर होत असतात. अशातच एक घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय मुलीचे फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणाशी ओळख होत त्याचे रुपांतर प्रेमात होत झाले. त्यानंतर तरुणीने लग्नाचे स्वप्न रंगवीत लग्नाची तारीखही ठरली मात्र तरूण लग्नाच्या दिवशी ‘नॉटरिचेबल’ झाल्याने चांगलीच धांदल उडाली अन प्रियकराने लग्नास नकार दिला हि घटना मुंबईतील सायन परिसरात घडली आहे.या प्रकरणी मुलीने थेट वडाळा टीटी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायन परिसरात २५ वर्षीय तरुणी आपल्या आजीसोबत वास्तव्यास आहे. सन २०१९ मध्ये तिची फेसबुकच्या माध्यमातून आसिफ नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. या दोघांमध्ये सातत्याने संवाद वाढत गेला. तिला त्याने प्रेमाची स्वप्न दाखवत तरुणीकडून होकार मिळवून घेतला. त्यानंतर नेहमीच दोघी वडाळ्यात भेटत होते.
तिला तो नेहमी कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी तसेच घेण्यासाठी जात असे. त्यांच्यात खूपच जवळीक वाढली. या दोघांमध्ये तब्बल ४ वर्ष प्रेमसंबध राहिले. मात्र तरुणीला शिवसेना कार्यालयात जानेवारी २०२३ मध्ये नोकरी मिळाल्यानंतर आसिफ तिला सातत्याने टाळू लागला. त्याने थेट लग्नासाठी नकार कळवला. या प्रकाराने तरुणी गोंधळली. ती नेहमीच त्याला लग्ना बाबत विचारणा करू लागली. तिने त्याला लग्नाबद्दल घरी बोलण्यास सांगितले. त्यावर तो नेहमी तिला वेळ मागत थांबवत असे. मात्र, दोघांमधील वाद वाढू लागले. त्यानंतर आसिफ त्याच्या परिवाराशी बोलला व परिवारातील सदस्यांनी होकार दिल्यानंतर दोघांनी न्यायालयात जात १ मे रोजी लग्नाची तारीख देखील निश्चित झाली. सर्व काही ठरल्याप्रमाणे तरुणी लग्नाचे स्वप्न रंगवत असताना अचानक लग्नाच्या दिवशी आसिफ लग्नासाठी नकार कळवत ‘नॉट रिचेबल’ झाला. अन तरुणीची पुन्हा एकदा धांदल उडाली अन तिने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे.