जळगाव मिरर / ४ मार्च २०२३ ।
चोपडा तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय तरुणाचा चाकूने खून करण्यात आल्याची घटना दि २ रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील भोजु वासुदेव कोळी (वय 32) या तरुणाला किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणाच्या घरी जावून दमदाटी करून चाकूने सपासप वार करून खून केला. हि घटना २ मार्च रोजी रात्री 9 वाजेदरम्यान घडला. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह पाच संशयितांना अटक केली आहे. त्याच्या मानेजवळ तसेच पाठीवर व इतर ठिकाणी संशयितांनी वार करत गंभीर दुखापत करून त्याचा खुन केला.
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला मृताचे वडील वासुदेव कोळी यांच्या फिर्यादीवरून एकूण पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर संशयितांना तत्काळ अटक देखील करण्यात आली आहे. यात सागर देविदास कोळी (३०), दिपक सुभाष कोळी (३०), कैलास गुलाब कोळी (३५), मनोहर संतोष कोळी (४०) व शोभाबाई देविदास कोळी (४५) (सर्व रा. विरवाडे ) अशी संशयितांची नावे आहेत. दिपक कोळी व भोजु वासुदेव कोळी यांचा एकमेकांना धक्का लागल्याचे कारणावरुन संशयितांननी भोजु कोळी व राजेंद्र कोळी यांना शिवीगाळ करून दमदाटी तसेच धक्काबुक्की केली.
त्यानंतर सागर कोळी याने राजेंद्र कोळी याचे कपाळावर दगड मारुन डोके फोडुन दुखापत केली. नंतर या भांडणाचा मनात राग ठेवून संशयित आरोपी सागर देविदास कोळी व शोभाबाई देविदास कोळी हे फिर्यादीचे घरासमोर अंगणात येवुन वासुदेव कोळी व त्याचा मुलगा भोजु कोळी यास शिवीगाळ, दमदाटी करत चापटा बुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी संशयित आरोपी सागर देविदास कोळी याने त्याच्याजवळील चाकुने भोजू कोळी याच्या मानेजवळ, पाठीवर तसेच इतर ठिकाणी मारुन गंभीर दुखापत करुन भोजू कोळी याचा खुन केला. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला वासुदेव कोळी यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 302, 337, 323, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले करत आहेत. याप्रकरणी आरोपी दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी, सागर देविदास कोळी,व शोभाबाई देविदास कोळी यांना पोलीसांनी रात्रीच ताब्यात घेवून अटक केली आहे.
