जळगाव मिरर | ११ फेब्रुवारी २०२४
शहरातील स्वातंत्र्य चौकात भरदिवसा दोन गटात झालेल्या वादातून गावठी कट्टा काढल्याची घटना घडली होती. तसेच पोलिसांना धक्काबुक्की – केल्याप्रकरणात चौघांना सुनावण्यात आलेल्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील स्वातंत्र्य चौकात गुरुवार दि. ८ फेब्रुवारी रोजी चार जण वाद घालत असताना – पोलिस त्या ठिकाणी पोहचले – होते. त्यावेळी चेतन रमेश सुशीर (वय १९, रा. पिंप्राळा हुडको), लखन दिलीप मराठे (वय ३०रा. शिवाजीनगर हुडको), सोनू उर्फ ललित गणेश चौधरी (वय २९, रा. ईश्वर कॉलनी), अतुल क्रिष्णा शिंदे (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी) यांनी पोलिसांना धक्काबुक्की करत धमकी दिली होती. त्या वेळी त्यांच्याकडे गावठी कट्टा आढळून आला होता. या प्रकरणात चेतन सुशीर, लखन मराठे, सोनू उर्फ ललित चौधरी, अतुल शिंदे यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी पोलिस कोठडी संपल्याने चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.