जळगाव मिरर । ११ जानेवारी २०२३ ।
जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी निर्माण झालेली आहे त्याचप्रमाणे त्या सरकारच्या धोरणामुळे सर्व शेतकरी, कष्टकरी वर्ग, इ. वर्ग यांचीच पिळवणूक होत आहे. अदाणी अंबानी या दोनच उद्योगपतीनी देशाची अर्थव्यवस्था काबीज केली आहे व तेच श्रीमंत बनत आहेत. जनतेमधील नाराजीला छेद देण्यासाठी मोदी सरकार राम मंदिर या मुद्द्याला जास्त प्राधान्य देत आहे. नाहीतर राम राम म्हणणे हे प्रत्येक भारतीयाच्या वळणी पडलेले असून त्यातून सद्भावना दिसून येते या सद्भावनाचा सामाजिक राजकीय पायाच मोदी सरकार उधवस्त करीत आहे. त्यामुळे जनता पर्याय शोधत आहे त्यासाठी श्रमिक जनतेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष मजबूत करणेचे आवाहन काम्रेड सुभाष लांडे यांनी जळगाव येथे बळीराम पेठेत झालेल्या पक्षाचे विस्तारित बैठकीत केले.
या बैठकीला पक्षाचे माजी राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे यांनी सांगितले की म येत्या 2024 साली मोदी सरकारचा पाडाव करण्यासाठी तमाम जातीवादी विरोधी पक्षांची एकजूट होणे अत्यंत गरजेचे आहे. आणि त्यासाठी डावा लोकशाही पर्याय हा जरी विश्वासार्ह वाटत असला तरी आघाडी मजबूत करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे गेल्या नागपूर विधिमंडळ अधिवेशन वर किसान सभा , शेतमजूर युनियन व इतर कामगार संघटना यांच्या तर्फे अलग दोन मोर्चे नेलेत त्यात हजारो लोकांचा सहभाग हा आपल्यावरील विश्वासाचे द्योतक आहे जळगाव जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांनी आगामी काळात पक्षाच्या राष्ट्रीय महाधिवेशन ने घेतलेल्या निर्णया नुसार सभासद संख्या वाढवावी असे आवाहन केले राष्ट्रीय कंट्रोल कमिशनचे सभासद काँम्रेड राम बाहेती यांनी राज्य व राष्ट्रीय अधिवेशन ची सविस्तर माहिती दिली व सक्रिय कार्यकर्त्यांचं कौन्सिल असणं आवश्यक आहे अशी गरज प्रतिपादन केली या बैठकीचे अध्यक्षस्थानी भुसावळ येथील कामगार नेते काँ राजेंद्र झा उपस्थित होते जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले व मागील तीन वर्षाचा कामाचा आढावा सादर केला. काम्रेड अमृत महाजन यांनी विविध आंदोलनातील भागीदारी बाबत मार्गदर्शन केले या बैठकीत कुरहे खु ता अमळनेर येथील सरपंच नीला बाई भील यांचा कामरेड लांडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला काम्रेड देविदास बोंदार्डे यांनी पक्ष संघटन लपक्ष घटना या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले जे डी ठाकरे यांनी विचार मांडले या बैठकीत पक्षाचे काम सुरळीत चालावे .
तसेच पक्ष वाढावा यांसाठी कॉम्रेड ज्ञानेश्वर पाटील , कॉम्रेड महाजन ,काम्रेड बोंदर्डे ,काम्रेड गोरख वानखेडे , काम्रेड लक्ष्मण शिंदे , कॉम्रेड राजेंद्र झा काम्रेड प्रल्हाद एरंडे या सात काम्रेड चे सचिव मंडळ व त्यांचे सह ३१ काम्रेड ची तात्पुरती जिल्हा समिती निवडण्यात आली आहे. येत्या २० फेब्रुवारी शहीद का गोविंद पानसरे यांचे मारेकरी यांना शिक्षा देणेस विलंब का? जबाब दो /.. मोर्चा राज्यभर कलेक्टर कचेरींवर काढणार आहेत . जिल्ह्यातून १००० पक्ष सभासद नोंदणी तसेच ५००००₹ पक्षनिधी गोळा करणार असे निर्णय घेण्यात आले या बैठकीला कॉम्रेड अरुणा काळे कॉम्रेड मंदाकिनी मोरे , कॉम्रेड सुमती वारके काम्रेड प्रकाश ला़बोळे , काम्रेड नरेंद्र पाटील , प्रल्हाद एरंडे काम्रेड वाल्मीक मैराळे , ,काम्रेड शफी उद्दिन सलौद्धिन , काम्रेड शांताराम पाटील आदींसह 75 कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.