जळगाव : प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी लागणारे दही दूध आणि मोदकही महाग झाले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य हवालदील झाला आहे. महागाईमुळे यंदा गणरायाचे आगमन झाल्यावर होणाऱ्या आनंदावर विरजण पडले आहे. महागाई वाढतच आहे, असा टोला एकनाथराव खडसे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
वाढत असलेल्या माहागाईवरून एकनाथ खडसे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हन केले. मात्र महागाईमुळे आनंदही राहलीला नाही आणि उत्साहही नाही, असं खडसे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खडसे कुटुंबीयांनी गणरायाची विधीवत पूजा करत स्थापना केली. यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती. खडसे कुटुंबीयांनी पूजा आणि आरती करून गणरायाची प्रतिष्ठापणा केली.