जळगाव मिरर । १५ डिसेंबर २०२३
जळगाव शहराला दोन मोठ्या परिसराला जोडण्यात येणारा उड्डाणपूल येत्या काही दिवसात वाहनधारकांसाठी सुरु होत आहे. तर या उड्डाणपुलाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी देखील मागणी होत असताना आज दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी बहूजन मुक्ती पार्टीतर्फे जळगाव मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड याना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, जळगाव शहरातील रिंग रोड ते नवीन कानळदा रोडला जोडणारा पिंप्राळा रेल्वे गेट वरील नव्याने तयार होत असलेला उड्डाणपूलास भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील शिवाजीनगर ते दूध फेडरेशन पर्यंत या परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा बहुजन समाज हजारोंच्या संख्येने वास्तवास आहेत आणि या परिसरातून सर्व लोकांची मागणी आहे की उड्डाणपूलास भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे म्हणून आज बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड याना निवेदन देण्यात आले.
यांनी दिले निवेदन !
या वेळी उपस्थित जिल्हा कार्याध्यक्ष विजय सुरवाडे, सुनिल देहडे, सागर सपकाळे, खुशाल सोनवणे, आनंद कोचुरे, हेमंत दाभाडे, अभिजित लोखंडे यांनी निवेदन दिले आहे.