जळगाव मिरर । २९ सप्टेंबर २०२३
राज्यातील समृद्धी महामार्ग गेल्या काही महिन्यापासून सातत्याने अपघाताच्या निमित्ताने चर्चेत येत असतो आज पुन्हा एकदा एका कारच्या मागचे टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहितीसमोर आली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अमरावतीवरून संभाजीनगरकडे जाणाऱ्या चारचाकीचे समृद्धी महामार्गावर मागील टायर फुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 जण ठार तर 3 जण जखमी झालेत. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कार्ली लोकेशन १६८ वर हा अपघात घडला आहे. अपघात इतका भीषण होता की कार थेट डिव्हायडरला धडकली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतास बाहेर काढून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रक्रूती चिंताजन असल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गावर वाहनांच्या वेगासह टायर फुटण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीये. समृद्धीचा मार्ग म्हणून हा महामार्ग बांधण्यात आला होता. मात्र येथील अपघाताच्या घटना वाढत असल्याने येथून प्रवास करण्यासाठी नागरिकांच्या मनात भीती भरलीये. समृद्धी महामार्गावर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत लहान-मोठे असे एकून ७२९ अपघात झालेत. यातील ४७ अपघातात व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय. या ४७ अपघातात १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर ९९ अपघातात २६२ जण गंभीर जखमी झाले आहेत.