
जळगाव मिरर | ३० एप्रिल २०२६
अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील शिक्षक गेल्या ३ दिवसापासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह गावातीलच विहिरीत आढळल्याची घटना २९ रोजी सकाळी उघडकीस आल्याने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत अविनाश रमेश पाटील (वय ४०) हे व्यवसायाने शिक्षक होते. त्यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान अविनाश पाटील हे काही दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला होता. अखेर तिसऱ्या दिवशी गावातील काहि नागरिकांना एका विहिरीत मृतदेह आढळला. त्यांनी ही माहिती तत्काळ इतर ग्रामस्थांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ही विहिर दुर्गम ठिकाणी असल्यामुळ आणि परिस्थिती गंभीर असल्यान जागेवरच मरणोत्तर पंचनाम करण्यात आला. प्राथमिक तपासात मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूबाब कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांन सांगितले. या प्रकरणी अमळने पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच नोंद करण्यात आली आहे. तपास अमळनेर पोलीस करत आहेत अविनाश पाटील हे माजी जि.प सदस्या मीनाबाई रमेश पाटील व रमेश काशीनाथ पाटील यांचे चिरंजीव होते.






















