जळगाव मिरर | २९ फेब्रुवारी २०२४
शहरातील आनंद नगरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ मंगळवार दि. २७ रोजी रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी सोनपोत जबरदस्तीने ओढून नेले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नेहरु नगरात कविता विजय जयस्वाल (वय ५०) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आनंद नगरातील स्वामी समर्थ केंद्राजवळून पायी जात होत्या. यावेळी मागून दुचाकीवरुन आले अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र जबरी ओढून घेतले. महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोन्ही चोरटे घटनास्थळाहून पसार झाले. त्यानंतर रात्री ११ वाता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे.