जळगाव मिरर / २६ एप्रिल २०२३ ।
राज्याच्या राजकारणातील शिवसेनेतून शिंदे ४० आमदारासह वेगळा गट निर्माण करून शिवसेनेवर हक्क दाखविला आहे. तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, ठाकरे गट व कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष आज देखील आहे. पण राज्यात अजित पवार मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यापासून महाविकास आघाडीत बिघाडी झाली कि काय अशा चर्चा रंगू लागल्या आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी थेट आम्ही कॉंग्रेसशी सुद्धा युती करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय चर्चेला उत आले आहे.
शिंदे गटातील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्या करता केलेली आहे. हिंदुत्वाकरता केलेली आहे. राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकतो हे कधीच होणार नाही, मात्र काँग्रेससोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे सांगत राहुल गांधींसमोर एक अट ठेवली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी हे पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. त्या काँग्रेसवाल्यांनी आमचे पठ्ठे फोडले. त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही. राहुल गांधी यांनी भगवा झेंडा हातात घ्यावा. त्यांनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत. गुलाबराव पाटील म्हणाले, यापूर्वीच आम्ही उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी होण्याआधी सावध केले होते की पुढे रेड झोन आहे. गाडी फेल होईल. जाऊ नका. आपण आता इथेच गाडी थांबवली पाहिजे. रस्ता चुकीचा दिसतोय. मात्र गाडीतले संजय राऊतसारखे काही चुकीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर भेटले. त्यामुळे गाडीचा अपघात झाला. गाडी दिशाहीन झाली, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावला.