अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात कापूसची मोठ्या प्रमाणात चोरी होत असतांना आता अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करीत शेतात उभ्या असलेल्या बैलगाडीतून दिवसाढवळ्या १२ हजार रुपये किमतीचा कापूस चोरून नेणाऱ्या तीनजणांना अटक करण्यात आली आहे. हे तीनही जण धुळे तालुक्यातील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील निम गावातील शरद विक्रम धनगर व लादू टोल चौधरी यांच्या शेतातून तब्बल १५० किलो वजनाचा कापूस या चोरट्यांनी गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चोरून नेला होता. याबाबत मारवड पोलिसात फिर्याद दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपी सुरेश देवीदास भिल (मोरे) (३१), भोला हिरामण हाके (२६) आणि अशोक बुधा गायकवाड (२६, तिन्ही रा. ढंढाणे, ता.जि. धुळे) यांना बेड्या ठोकल्या आहे.