जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील समता नगर परिसरातील वंजारी टेकडी याठिकाणी आज दि.१९ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तीन घरांना अचानक लागलेल्या आगीमुळे तीनही घरांमधील हजारो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली . महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली .
या आगीमध्ये रवींद्र चव्हाण,समाधान चव्हाण,धडकू बाई चव्हाण,यांच्या घरांना आग लागून संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. . जळगांव माहापालिकेचे अग्निशमन दलाचे फायरमन अश्वजीत घरडे,तेजस जोशी, जगदीश साळुंखे व वाहन चालक संजय भोईटे आदींच्या पथकाने आग आटोक्यात आणली