जळगाव मिरर | १४ मे २०२३
देशात बदलत्या हवामानामुळे उष्णतेच्या वार्यांचा वेग प्रंचड वेगाने वाहू लागले आहे. जिल्ह्यासह शहरात देखील उष्णतेची लाट सुरु आहे. यामुळे शुक्रवारी एक महिलेचा दुदेवी मृत्यू झाला आहे. शनिवारी देखील तापमान 45 अंशावर पोहोचले असून नागरिकांंना उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. त्यामुळे सायंकाळी ७ वाजेनंतर नागरिक बाहेर पडू लागल्याने शहरातील अनेक बाजार पेठ संध्याकाळी गजबजू लागले आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याला उन्हाचा तडाखा वाढला असून सकाळी आठ वाजेपासून उन्हाचे तीव्र चटके बसत आहे. दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते देखील निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. आज किमान तापमान 45 अशांवर नोंदविले गेले आहे. तापमान 45 अंशावर आल्याने नागरिकांनी उन्हाचा धसका घेतला असून ‘मे हिट’अधिकच तापदायक ठरत असल्याने लग्नसराईच्या उपस्थितीवर परिणाम होत आहे.