
जळगाव मिरर | १९ जुलै २०२३
राज्यातील संजय गांधी निराधार, श्रावण बाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना व विधवा वेतन योजना, कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनांच्या लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढविण्या बाबत माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदमध्ये प्रश्न उपस्थित केला
यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले राज्यातील संजय गांधी निराधार, श्रावण बाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना व विधवा वेतन योजना, कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनांच्या अंतर्गत 65 वा 65 वर्षावरील अपंग वृद्ध ,विधवा, अनाथ, दुर्लक्षित गरजू घटकांना आर्थिक मदत दिली जाते. सदर योजनांच्या लाभासाठी लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा 21000 एवढी असून उत्पन्न दाखल्यासाठी बराच कालावधी लागत असल्यामुळे अर्जदार लाभार्थ्यांना आर्थिक, मानसिक, त्रासास सामोरे जावे लागते हे खरे आहे का?
सदर योजनेसाठी उत्पन्न दाखले देताना तहसीलदार यांचेकडून टाळाटाळ अथवा विलंब केला जात असल्यामुळे गरजू लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबतचा पत्र व्यवहार मा मुख्यमंत्री यांचेकडे लोकप्रतिनिधीनी 25 मे रोजी केला आहे.
उपरोक्त विषयावर शासनाने चौकशी केली आहे का?चौकशीच्या अनुषंगाने योजने अंतर्गत लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढविण्या बाबत कोणती कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नांला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उत्तर दिले
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले राज्यातील संजय गांधी निराधार, श्रावण बाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना व विधवा वेतन योजना, कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनांच्या अंतर्गत 65 वा 65 वर्षावरील अपंग वृद्ध ,विधवा, अनाथ, दुर्लक्षित गरजू घटकांना आर्थिक मदत दिली जाते यासाठी 21000 उत्पन्न मर्यादा आहे. हि उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पत्रव्यवहार केला आहे
विशेष सहाय्य योजनेकरिता असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आली नसुन विभागाच्या दि 5/7/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थ सहाय्यात दरमहा रु 1000 वरून 1500 इतकी वाढ करण्यात आली आहे





















