जळगाव मिरर | राजकीय विशेष
राज्यात गेल्या काही वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे महायुती सरकारकडे सातत्याने आरक्षणाची मागणी करीत होते मात्र आरक्षणाची मागणी आतापर्यत मान्य न झाल्याने सध्या राज्यात मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिकेत दिसत आहे. जर येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर अनेक जिल्ह्यात व जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदार संघात मराठा समाज निर्णायक ठरू शकतो. त्याचा फटका महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवाराना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जळगाव जिल्ह्याचे लक्ष सध्या पाचोरा – भडगाव मतदार संघावर आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाचोरा – भडगाव मतदार संघात ‘भाऊ-बहिण’ अर्थात महायुतीतील शिंदे गटाचे आ.किशोर आप्पा पाटील व महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्यात रंगत दिसत असली तरी अद्याप त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही तरी देखील महाविकास आघाडीतर्फे वैशालीताई सूर्यवंशी व महायुतीतील शिंदे गटाचे आ.किशोर आप्पा पाटील यांच्यात लढत असली तरी पाचोरा – भडगाव मतदार संघात मराठा समाजाची मोठी ताकद आहे. यात भाजपचे नेते अमोल शिंदे हे देखील उमेदवारी करणार असल्याचा दावा होत आहे. आगामी काळात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व या मतदार संघात तगडा उमेदवार दिल्यास मराठा समाज निर्णायक भूमिका घेवू शकतो.