
जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२५
धरणगाव तालुक्यातील वाकटुकी गावाजवळील विहीर फाट्याजवळ दि. २१ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एकाने गावठी कद्वयातून डोक्यात गोळ्या झाडून एका ४० वर्षीय प्रौढाची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ग्रामपंचायतीच्या वादातून सन २०११ मध्ये ज्ञानेश्वर कोळी यांचा खून झाला होता. या गुन्ह्यात निर्दोष मुक्त झालेल्या संशयित गोपाल सोमा मालचे (भील) (वय ५०, रा. वाकटुकी, ता. धरगाव, ह.मु. करमुड, ता. चाळीसगाव) यांची राहुल ज्ञानेश्वर कोळी (वय २५, रा. वाकटुकी, ता. धरणगाव) याने गावठी कद्वयातून डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. तब्बल १४ वर्षानंतर वडीलांच्या खूनाचा बदला खूनाने घेवून संशयित हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.
सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथे सन २०११ मध्ये ग्रामपंचायतीच्या वादातून ज्ञानेश्वर कोळी यांची निघुण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संशयित म्हणून गोपाल मालचे यांना देखील अटक करण्यात आली होती. काही वर्ष शिक्षा भोगल्यानंतर मालचेसह इतर सर्व संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर मालचे हे वाकटुकी गाव सोडून तो कुटुंबियांसह करमुड ता. चाळीसगाव येथे स्थायिक झाला होते. दोन दिवसांपुर्वी गोपाल मालचे हे गावात आले होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वाकटुकी गावाजवळील विहीर फाट्याजवळून जात असतांना त्यांची चारचाकी अडवली. ते चारचाकीतून खाली उतरताच त्याच्या मागावर असलेल्या राहूल कोळी याने गावठी कद्वयातून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.
गोळ्या झाडून गोपाल मालचे याची हत्या केल्याची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले, पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे सपोनि प्रशांत कंडा-रे, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ जितेंद्र पाटील, विष्णू बिन्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताचा शोध सुरु केला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच संशयित राहल कोळी हा स्वतःहून पोलीसांच्या स्वाधीन झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. हत्त्येची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाचे उपअधिक्षक घोलप यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.




















