• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राज्यातील शाळा बंद पडण्याची भीती : कॉंग्रेस नेत्यांचा दावा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 9, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सरकारी योजना, सामाजिक
0
राज्यातील शाळा बंद पडण्याची भीती : कॉंग्रेस नेत्यांचा दावा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जुलै २०२५

राज्यातील अधिवेशन सुरु असून आज राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद पडण्याची भीती असल्याचा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत केला. यापूर्वी सरकार गाव तिथे शाळा या तत्वानुसार 1 विद्यार्थी असला तरी त्याला शिक्षक मिळायचा. पण आज सरकार शाळा बंद कशा करता येतील यावर भर देत आहे. त्यामुळे सरकारने पटसंख्येची मर्यादा न लावता 1 मुलगा असला तरी आम्ही त्याला शिकवू असे आश्वासन सरकारने दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त केली. महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद पडण्याची भीती जनतेत निर्माण झाली आहे. कारण, सरकारने 20 हून कमी विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या शाळांवर मर्यादा लादली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सरकारने गाव तिथे शाळा धोरण राबवले होते. या तत्वानुसार शाळेत एक विद्यार्थी असला तरी त्या वर्गाला शिक्षक मिळत होता. पण आज तशी परिस्थिती नाही. विद्यमान सरकार शाळा बंद कशा करता येतील यावर भर देत आहे. त्यामुळे पटसंख्येची मर्यादा न लावता एक मुलगा असला तरी आम्ही शिकवू असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

नाना पटोले यांनी यावेळी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचाही मुद्दा उपस्थित केला. भर पावसात आझाद मैदानावर हजारो शिक्षक चिखलात आंदोलन करत आहेत. ज्ञानार्जनाचे पवित्र काम करणाऱ्या गुरुजनांना अशा प्रकारे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मैदानात उतरून लढाई करावी लागणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचे जाहीर केले होते, परंतु आता शासनाने अनुदान देण्याचे काम बंद केले आहे. काल अक्षरशः शिक्षक चिखलात झोपले होते. त्यामुळे माझा प्रश्न आहे की, सरकारने ठरवल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचे धोरण कधी लागू करेल? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नाना पटोले यांच्या या प्रश्नाला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, या राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही. कोणतीही शाळा बंद होणार नाही, यासंबंधीचा निर्णय शासन घेईल. विशेषतः अशी कुठेही स्थिती नाही. पण पटसंख्या 20 असेल तर यापूर्वीच्या धोरणानुसार कारवाई केली जात आहे. तिथे किमान एक शिक्षक कार्यरत आहे. त्याहून जास्त संख्या असेल तर स्थानिक पातळीवर सेवानिवृत्त शिक्षक असतील तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो.

15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार मी यापूर्वीच उत्तर दिले आहे की, नववी, दहावीच्या बाबतीत जी काही शिथिलता आणण्याची गरज आहे. त्याचा प्रस्ताव आता मिळाला आहे. त्यानुसार या प्रकरणी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे हा यामागचा हेतू आहे. परंतु शाळांचीही पटसंख्या टिकवण्याची जबाबदारी आहे. केवळ शिक्षक संख्येसाठी आपण धोरण ठरवायला गेलो, तर ते विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल.

दरम्यान, दादा भुसे यांनी शिक्षकांच्या आंदोलनावर भाष्य करताना या प्रकरणी आंदोलक व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.

 

 

Related Posts

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

June 2, 2026
महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ
जळगाव

महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

June 2, 2026
एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !
जळगाव

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

June 2, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
जळगाव

‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
बदल्यांसाठी ‘वशिला’ बंद : एसपी धिवरेंचा कडक आदेश, कार्यालयाबाहेर फलक झळकला
जळगाव ग्रामीण

बदल्यांसाठी ‘वशिला’ बंद : एसपी धिवरेंचा कडक आदेश, कार्यालयाबाहेर फलक झळकला

June 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

June 2, 2026
महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

June 2, 2026
एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

June 2, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

June 2, 2026

Recent News

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

June 2, 2026
महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

June 2, 2026
एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

June 2, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

June 2, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group