जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२५
१ ऑगस्ट १९२० रोजी जन्मलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राच्या मातीतले थोर समाजसुधारक, लोककवी आणि प्रतिभासंपन्न लेखक होते. दलित समाजाच्या दुःख, संघर्ष आणि स्वाभिमानाला त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रभावीपणे शब्दबद्ध केले. उपेक्षित आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या लेखनात समाज परिवर्तनाची ताकद होती आणि म्हणूनच त्यांना ‘लोकशाहीर’ ही उपाधी लाभली.
समाजप्रबोधन, संघर्ष आणि साहित्य या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजाला नवा मार्ग दाखवणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आज १०५व्या जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशन तर्फे नेरी नाका चौक येथे त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी फाउंडेशनचे मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, ज्येष्ठ समाजसेवक विजय दहियेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, तसेच उमेश माछरेकर, गौतम बागडे, संदीप गारुंगे, पंकज गागडे, संदीप बागडे, राहुल दहियेकर, कार्तिक बाटूंगे, कमल गागडे आदी मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.
