जळगाव मिरर | ११ फेब्रुवारी २०२६
पत्नी नातेवाईकांकडे लग्नासाठी गेलेली होती, तर मुले बाहेर गेलेली होती. त्यामुळे घरात कोणीही नसतांना सुकलाल नारायण गोपाळ (वय ४५, रा. समता नगर) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. येत्या पंधरा ते वीस दिवसांवर मुलीचा लग्न सोहळा होता, त्यापुर्वीच वडीलांनी टोकाचा निर्णय घेतल्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील जवखेडा येथील सुकलाल गोपाळ हे कुटुंबियांसह समता नगरात वास्तव्यास होते. मजूरी काम करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. गोपाळ यांच्या मलीचे लग्न ठरले असन त्याची घरात लगबग सुरू आहे. दि. ९ रोजी त्यांची पत्नी जवखेडा या मूळगावी नातेवाईकांकडे लग्नाला गेलेली होती. तर मुलगा व मुलगी बाहेर गेलेले होते. त्या वेळी घरात कोणीही नसतांना सुकलाल गोपाळ यांनी गळफास घेतला. मुलगा घरी आला त्या वेळी ही घटना लक्षात आली. प्रौढास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रवीण जगदाळे करीत आहेत.





















