
जळगाव मिरर | २२ जून २०२६

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी विक्रमी ५७७ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी दाखविलेली अभूतपूर्व एकजूट, प्रभावी संघटनशक्ती आणि लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा विजय ऐतिहासिक ठरला आहे.
या निवडणुकीत राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नेतृत्व करत महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र ठेवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील, राज्याचे मंत्री ना. संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी एकदिलाने काम करत विजयासाठी भक्कम वातावरण निर्माण केले.
तसेच जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर निलेश पाटील, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजप शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेना शहराध्यक्ष विष्णू भंगाळे तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदार प्रतिनिधींनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत झालेल्या बैठका, समन्वय मेळावे, मतदार संपर्क अभियान आणि संघटनात्मक नियोजनामुळे महायुतीची ताकद अधिक प्रभावीपणे समोर आली. जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांपासून महानगरपालिकांपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दाखविलेली एकजूट या निकालातून अधोरेखित झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सौ सुमित्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासाभिमुख शासनव्यवस्थेवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेला विश्वासही या निकालातून स्पष्टपणे दिसून आला. राज्य शासनाच्या विविध विकासकामांना आणि लोककल्याणकारी योजनांना मिळालेल्या पाठिंब्याचे प्रतिबिंब या विजयामध्ये पाहायला मिळत आहे.
नंदकिशोर महाजन यांना मिळालेली विक्रमी ५७७ मते ही केवळ विजयाची आकडेवारी नसून महायुतीच्या नेतृत्वावर, विकासाच्या राजकारणावर आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांवर व्यक्त झालेला विश्वास आहे. जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व नेते, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या समर्पणामुळे हा विजय शक्य झाला असून आगामी काळातही विकास आणि जनसेवेची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नंदकिशोर महाजन यांच्या या विक्रमी विजयाने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला असून हा विजय खऱ्या अर्थाने महायुतीच्या एकजुटीचा, विकासाच्या राजकारणाचा आणि जनविश्वासाचा विजय ठरला आहे.




















