अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यात जयेश शरद पाटील याचा मृत्यू झला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेताच्या बांधावर चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने त्याने गळफास घेतला. त्याने आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. त्याचा मृतदेह पाहताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. मुरलीधर आनंदा पाटील यांनी मारवड पोलिस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हे. कॉ. सुनील आगोने करीत आहेत. जयेशने बीएडची परीक्षा दिली होती. त्यात तो दोन विषयांमध्ये नापास झाल्याचे काहींनी सांगितले. मात्र, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही उघड झालेले नाही.