
जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२६
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव शाखेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक समता, न्याय, बंधुता आणि शिक्षणाच्या संदेशाचे स्मरण करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना थंड पेयांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सुमारे २५०० पेक्षा अधिक लोकांना शीतपेय वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा उत्तम संदेश देण्यात आला.
यावेळी अभाविपचे सर्व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सर्वांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा संकल्प केला.






















