जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील एका परिसरातील तरुण नोकरीनिमित्त पुण्यात राहत असलेल्या तरुणाचे जळगावात घर आहे. महिनाभरपासून बंद असलेल्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली. येथून चोरट्यांनी टीव्ही, सिलींग फॅन आणि तांब्याचे भांडी असा एकुण २३ हजारांचा ऐवज लांबविला याप्रकरणी शुक्रवारी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील असावा नगरात दिपक विजय पाटील हा तरूण वास्तव्यास आहे. परंतु नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाला आहे. त्यामुळे त्याचे घर दि. १० सप्टेंबरपासून कुलूप लावून बंद होते. अनेक दिवसांपासून घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून देत तेथून टीव्ही, चार सिलींग फॅन आणि तांब्याची भांडी असा एकुण २३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दीपक पाटील हा परिवारासह गुरूवारी जळगावातील घरी आला असता. त्याला घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता घरातून सामान चोरून नेल्याचे लक्षात आले.
घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच दीपकने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी करीत आहे.