
जळगाव मिरर | राजकीय विशेष
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे, त्यामुळे सर्वच नेते जनसंपर्क करण्यासाठी मोठा भर देत आहे. मात्र जळगाव ग्रामीण मतदार संघात ‘तुतारी’ कुणाची हे अद्याप मतदारांपर्यत न पोहचल्याने सांशकता निर्माण झाले आहे. या मतदार संघात ‘धनुष्यबाणाचा’ सध्या बोलबाला दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदार संघात नेहमीच अटीतटीचा सामना नेहमी होत असतो. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघात सध्या ‘तुतारी’चा प्रचार असो व प्रसिद्धी सध्या दिसून येत नसल्याने ‘धनुष्यबाणा’ने हि संधी साधत मतदारांपर्यत पोहचत आपले व्हिजन पटवून देण्याची संधीचे सोने करीत आहे. मात्र आगामी काळात ‘तुतारी’ चालते कि ‘धनुष्यबाण’ चालतो हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.