जळगाव मिरर / २९ एप्रिल २०२३ ।
राज्यातील बदलत्या हवामानाने मराठवाडा, विदर्भपाठोपाठ खान्देशात अवकाळी पावसाने थैमान घेतले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरीचे मोठे नुकसान देखील झाले आहे. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.
जळगाव शहरात देखील दोन दिवसापासून वादळ वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. सोबतच उन्हाळ्याचा महिना असल्याने अनेक भागात रस्त्याचे कामे देखील सुरु आहे. पण दोन दिवसात झालेल्या पावसाने रस्ते वाहून गेल्याचे चित्र काही परिसरात दिसले तर आज दि २९ रोजी दुपारपासून सुरु असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शहरातून निमखेडी रस्त्यावर असलेल्या विठ्ठल वाडीच्या मुख्य रस्त्यावरील झाड मुळापासून कोसळले आहे. सुदैवाने झाड कोसळले तेव्हा या ठिकाणी कुणीही नसल्याने दुर्घटना टळली आहे.