जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर
देशभरात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना पजांबमधील पटना या शहरात घडली आहे. आपल्या १५ वर्षीय बहिणीची गळा दाबून सख्खा भावानेच निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मधुबनीतील लौकाहा पोलीस स्टेशन परीसरात राहत होती. नवरात्रीदरम्यान २१ ऑक्टोबर रोजी पीडिता संध्याकाळी जवळच्या मंदिरात गेली होती. बराच काळ होऊन देखील ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबियांना शोधाशोध सुरू केली. तिचा खूप शोध घेतला परंतू दोन दिवस झाले तरी मुलीचा काहीच पत्ता नव्हता. त्यामुळे तिच्या घरच्यांनी थेठ पोलीस ठाणे गाठले आणि मुलगी सापडत नसल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. या प्रकरणाचा तपास सुरु असताना पोलिसांना संशयाची सुई पीडितेच्या मोठ्या भावापर्यंत येऊन पोहचली.
पीडितेच्या भावाने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी चौकशीदरम्यान तिच्याबद्दल विचारले असता त्याने हत्येता सर्व प्रकार सांगितला. आरोपीने पोलिसांना दिलेल्या कबूलीनुसार, आपल्या बहिणीला त्याने परीसरातील एका मुलासोबत पाहिले होते. यावरुन आरोपीला आपल्या बहिणीचे आणि त्या मुलाचे काही तरी संबंध आहेत असे वाटले. यावरुन आरोपी भावाने रागाच्या भरात बहिणीची गळा दाबून हत्या केली. तसेच तिचा मृतदेह नदी जवळ पुरला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.