जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करीत असताना अनेक जिल्ह्यात राजकीय नेत्यांना देखील गावबंदी करण्यात आली आहे तर बीड जिल्ह्यात आमदाराचे देखील घर व कार्यालय जाळल्याचा प्रकार घडल्याने आंदोलन चांगलेच पेटले आहे तर आता मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्यातील अनेक गावात मराठा समाजाने राजकीय नेत्यांना गावबंदी केल्यानंतर आता राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि नेते यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली असून यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी पत्र लिहीत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे की, ”महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून या मराठा आरक्षणासाठी माझा पाठींबा असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.