
जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२६
भारत हा जातींचा देश आहे हे या देशाचे वास्तव आहे.स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही हे वास्तव बदललेले नाही.या देशातील प्रत्येक जातीला त्याच्या प्रमाणात प्रतिनिधित्त्व मिळालेले नाही.
१)इतर मागास वर्गाची अर्थात ओबीसी हा वर्ग संख्येने सर्वाधिक असलेला वर्ग मात्र स्वातंत्र्यानंतर आजतागायत या वर्गाची जातीनिहाय जनगणनाच केलेली नाही.आणि जर संख्याच कळली नाही तर शासन स्तरावर शिक्षण/नोकरी/आणि राजकारणात त्याचे प्रतिनिधित्त्व निश्चित कसे करणार? आणि त्यामुळेच आजतागायत या वर्गाला त्याच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्त्व मिळू शकले नाही.सरकारने २२ जाने.२०२६ च्या अधिसुचनेनुसार जण-गणना करण्याचे घोषित केलेले आहे,मात्र त्यातही ओबीसी वर्गाच्या जातीचा रकानाच नसल्याने जनगणना न करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.असे करणे म्हणजे ओबीसी वर्गाची घोर फसवणूक आहे.
२)उच्च शिक्षण क्षेत्रात एस.सी.,एस.टी.,ओबीसी विद्यार्थ्यांशी होणारा जातीय भेदभाव आणि त्यातून होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी सख्त यु.जी.सी.इक्विटी रेग्युलेशन तात्काळ लागू करण्यासाठी ३)२०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून (TET) सूट देण्याच्या समर्थनार्थ भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम व राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली देशव्यापी चरणबद्ध आंदोलन घोषित करण्यात आले होते.त्याचे चौथे चरण म्हणजे आजचा भारत बंद हे होते.
जळगाव जिल्ह्यात २० सेंटरवर भारत बंद
जळगाव जिल्ह्यात देखील २० सेंटरवर भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष देवानंद निकम व राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष सुभाष नावडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारत बंद आंदोलन करण्यात आले.
भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा.देवानंद निकम व राष्ट्रीय पिछडावर्ग मोर्च्याचे शहराध्यक्ष मा. वसंत कोलते यांच्या नेतृत्त्वाखाली जळगाव मध्ये हा बंद करण्यात आला. टॉवर चौक,चित्रा चौक,दाणा बाजार,घाणेकर चौक,नेहरु चौक,कोर्ट चौक या रहदारीच्या ठिकाणी शेकडो आंदोलकांनी चक्का जाम केला,त्यामुळे जळगाव शहरातील वाहतुक बराच वेळ विस्कळीत झाली.
सदर भारत बंद ला राष्ट्रीय सेन संघ,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, आदिवासी टोकरे कोळी महासंघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय मुलनिवासी पेन्शनर संघ,भारतीय विद्यार्थी मोर्चा,राष्ट्रीय मूलनिवासी मुस्लीम मोर्चा,बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क,राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ,बहुजन मुक्ती पार्टी……….इ.सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग दर्शविला .सदर बंद मध्ये जळगाव जिल्हा प्रभारी आंदोलन समिती मा.सुनिलभाऊ देहडे, राष्ट्रीय सेन संघाचे राष्ट्रीय सचिव राजकुमार गवळी,मराठा सेवा संघाचे खुशाल चव्हाण, सावरकर रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे,आदिवासी टोकरे कोळी संघाचे गोपाळ कोळी,दिलीप जाधव,डी.एम.भालेराव,रविंद्र मोरे,श्रीकांत तायडे , राष्ट्रीय मुलनिवासी साहित्य संघाचे शशिकांत हिंगोणेकर, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.शाकीर शेख,.प्रा.रामभाऊ सोनवणे,खुशाल सोनवणे,वसंत कोलते,जगदीश सपकाळे,अशोक बाविस्कर, रघुनाथ घोडेस्वार,छोटू लोहार,अरुण लोहार,कैलास म्हसाने,भिमराव नन्नवरे,खलील खाटिक ,रमेश थाटे,मा.अशोक तिडके,मा.संदीप भारंबे,ईश्वर सोनवणे,खुमानसिंग बारेला सुनिल सोनवणे,राहुल सोनवणे,तपन ह्याळिंगे, श्रीकांत तायडे,हाफिज दानिश अली,आदित्य देहाडे, संगिताताई देहडे,अनिताताई पेंढारकर, दिपाली पेंढारकर या प्रमुख पदाधिका-यांच्या सहित शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यासह ७२५ जिल्ह्यात आणि ३१ राज्यात हा भारत बंद यशस्वीपणे संपन्न झाला.






















