चाळीसगाव : कल्पेश महाले
शहरातील अभिनव शाळेत दहावीच्या वर्गात असलेला १६ वर्षीय मुलगा बेपत्ता झालेला आहे. शाळेतून सायकलने घरी जाण्यासाठी निघाला असता तो घरी पोहोचलाच नाही. या मुलास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून आमिष दाखवून पळवून नेल्याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील धुळे रोडवरील मोरया नगर मध्ये राहणारा १६ वर्षीय विद्यार्थी चि.सार्थक अनिल पाटील हा १० वी च्या वर्गात शिकतो. शुक्रवारी दुपारी सार्थक हा शाळेत गेला शाळेत मुलांनी खोडी काढल्याच्या कारणावरून पालकांना बोलवण्यात आले होते. सार्थकची आई शाळेत गेल्या. वाद मिटल्यानंतर त्या घराकडे स्कूटरने जात असताना व सार्थक त्यांच्या पाठीमागे सायकलने येत असताना येत सार्थकची आई पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेल्या असता पेट्रोल भरल्यानंतर त्या घराकडे जात असताना त्यांना सार्थक दिसून आला नाही त्याचा शहरात सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
त्यामुळे त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने त्याचा अज्ञान पणाचा फायदा घेऊन त्याला काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पाळवून नेले म्हणून सार्थकच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्णन – उंची ५ फूट, रंग गोरा, चेहरा गोल, अंगात सफेद रंगाची फुलं पँट, सफेद रंगाचा शर्ट, पाठीवर ब्ल्यू रंगाच्या दप्तरात वह्या पुस्तके असुन पायात काळ्या रंगाचे बुट आणि जवळ ग्रे काळ्या रंगाची सायकल आहे.