जळगाव मिरर / ३० नोव्हेंबर २०२२
शहरातील सुरत रेल्वे गेट ते गुजरात पेट्रोल पंप या मुख्य रस्त्यांहुन जाणाऱ्या वाहनांमुळे या परिसरातील प्रचंड धुळ निर्माण होतोय या प्रमुख मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी जळगाव मनपा आयुक्त व उपमहापौर कुलभूषण पाटील यांना निवेदन देवून आपली तक्रार केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सूरत रेल्वे गेट ते पेट्रोल पंप या रस्त्यावर जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात प्रचंड धुळ होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. सूरत रेल्वे गेट जवळ मालधक्का अूसन सर्व ट्रक याच भागातून ये-जा करीत असतात. या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक लहान मुले, महिला खोकल्यासह श्वसनाच्या आजार होवू शकतात. यामुळे नागरिकांचे आरोग्याची जळगाव शहर महानगरपालिकेने घ्यावी अशी मागणी देखील या परिसरातील नागरिकांनी केली आहे. निवेदनावर डॉ. सुभाष सोनवणे,प्रा.सौ. शालिनी सोनवणे, सी.बी.जमकर, गणेश महाजन, महेंद्र पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.