
जळगाव मिरर | १३ मे २०२६
धावत्या रेल्वेतून पडल्याने दीपक जगन्नाथ माळी (वय ३५, रा. रामेश्वर नगर सिडको नाशिक) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पिंप्राळा उड्डाणपुलाखाली असलेल्या रेल्वे रुळावर घडली. मयताच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डवरुन त्याची ओळख पटली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा उड्डाणपुलाखाली अपलाईनवरील खांबा क्रमांक ४१७/ २१ जवळ रेल्वेतून पडल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना डायल ११२ वर समजली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यातील निलेश पाटील, तेजस सोनवणे, कल्पेश गायकवाड, अतुल झोपे हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मयत हा रेल्वे रुळाच्या शेजारी जखमी अवस्थेत पडलेला होता. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या खिशात फुटलेला मोबाईल आणि आधारकार्ड मिळून आले. त्यावरुन दीपक जगन्नाथ माळी असे मयत इसमाचे नाव असून तो नाशिक येथील रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वेतून पडल्याने दीपक माळी यांचा मृत्यू झाल्यानंतर तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांसह शिवकॉलनी उड्डाणपुलावरुन मृतदेह बघण्याकरीता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रस्त्याच्याकडेला वाहने लावून तेथून येणारे जाणारे मृतदेह बघण्यासाठी गर्दी करीत असल्याने याठिकाणी काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
रेल्वेतून पडल्याने दीपक माळी यांचा मृत्यू झाल्यानंतर तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांसह शिवकॉलनी उड्डाणपुलावरुन मृतदेह बघण्याकरीता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रस्त्याच्याकडेला वाहने लावून तेथून येणारे जाणारे मृतदेह बघण्यासाठी गर्दी करीत असल्याने याठिकाणी काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.





















