
धरणगाव : विनोद रोकडे
शहर शिवसेना पदाधिकारी यांनी शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ याचा नेतृत्वाखाली धरणगाव येथील उपविभागीय पाट बंधारे अधिकारी विजय जाधव यांची भेट घेऊन दिनांक १५ पासून रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून रब्बी हंगाम घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाटाला पाणी सोडण्यात यावे तसेच पाटचऱ्या दुरुस्ती करण्यात याव्या रब्बी हंगामसाठी नोव्हेंबरचा शेवटच्या आठवड्यात पाणी सोडावे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पीक घेण्यासाठी एकूण पाच आवर्तन सोडण्यात यावे.
तसेच गिरणा कलवा सल्लागार समिती बैठक घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा असे निवेदन म्हटले आहे यावेळी उपस्थित शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी , उपजिल्हा ऍड शरद माळी, राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख धिरेंद्र पुरभे भागवत चौधरी जानकीराम पाटील नंदू पाटील नगरसेवक जितू धनगर भीमराव धनगर, सुनील चव्हाण भगवंत मोरे सम्राट धनगर नंदू पटूने राहुल रोकडे ज्ञानेश्वर महाजन सह शेतकरी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.




















