जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२३
राज्यात नुकताच १५ ऑगस्ट दिन सर्वत्र साजरा झाला असून लागलीच दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास तीन जिल्हात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची बातमी समोर आली आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्का जाणवला. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवून आला.