जळगाव मिरर | २७ नोव्हेंबर २०२३
देशातील बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यात पावसाचा हाहाकार सुरु झाला असून आता गुजरात राज्यात देखील आज सकाळपासून अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. या अवकाळी पावसाने वीज पडून तब्बल २४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून २३ जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील दाहोद जिल्ह्यात चार जणांचा तर बनासकांठा आणि भरूच जिल्ह्यात प्रत्येकी ३, तापी जिल्ह्यात २ , तर अहमदाबाद, अमरेली, आनंद, खेडा, द्वारका, पंचमहाल, पाटण, बोताड, मेहसाणा, साबरकांठा, सुरत आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यात प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे.
सततच्या मुसळधार पावसासोबतच वीज पडून 71 गुरांचा मृत्यू झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे सुरत, जुनागढ आणि नर्मदा येथे कच्च्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. 29 ठिकाणी झोपड्या आणि कच्ची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. याशिवाय शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.