
भुसावळ : प्रतिनिधी
पाऊस पडला कि सगळीकडे उत्साह पसरतो . पाणी म्हणजेच जीवन . ज्यामुळे शेतात पिके येतात , नदीला पाणी मिळते . पण पाऊस पडूनही तहान न भागणे म्हणजे दुर्देव. यावल जवळ टिटवा नावाच्या आदिवासी पाड्यावर अशीच दुर्देवी वेळ आली होती. पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. ट्यूब वेलची सोय तर झाली पण लाईट नसेल तर कसे करणार ?
अतिशय हालाखीची परिस्थिती या लोकांची झाली होती. ही बाब भुसावळ येथील सक्षम नारी फाउंडेशन यांच्या निदर्शनास आली . आणि मग सक्षम नारी फाउंडेशनने टिटवा येथे दोन हजार लिटर पाण्याची टाकी देवून सक्षम व स्तुत्य असे कार्य केले . मीरा रोड (मुंबई ) येथील स्थायिक प्रमिला पोटे यांनी पतीच्या निधनानंतर त्यांची आठवण म्हणून त्यांनी उपक्रमास देणगी देवून हातभार लावला . तरअँड जास्वन्दी भंडारी यांनी देवगिरी आश्रम कल्याण मार्फत उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले .
यावेळी टाकीचे लोकार्पण करतांना सक्षम नारी फाउंडेशनच्या डॉ सुवर्णा गाडेकर , डॉ रंजना शिंगणे . संघमित्रा ढाकणे . वंदना कांबळे . शीतल मोरे , शीतल भालेराव , वंदना हंस , सुनीता जोशी , सुनंदा डांगे , संगीता जगताप , पल्लवी अंबाडे आणि जास्वंदी भंडारी यांचेसह महिला भगिनी उपस्थित होत्या .




















