जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२६
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चेवरून वाद उभा राहिला आहे. पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर निशाणा साधत, त्यांच्या शंका आणि सक्रियतेमुळे पक्षातील गोंधळ निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले.
हसन मुश्रीफ म्हणाले की, “रोहित पवार यांना काकांचे विमान अपघातात निधन झाल्यावर त्यांना जितके दु:ख झाले, त्यापेक्षा आमच्यासाठी अधिक दु:ख झाले आहे. आमच्या मनात काही शंका आहेत आणि त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. आमच्या पक्षातील अंतर्गत गोष्टींमध्ये रोहित पवारांनी भाग घेऊ नये. त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत जी माहिती दिली, त्याबद्दल त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, विलीनीकरणाच्या चर्चेत ते स्वतः सहभागी नव्हते, पण काही नेते अशा चर्चेत म्हणत आहेत की शरद पवार यांनी थांबावे आणि अजित पवार यांच्याच्या हाती सूत्र द्यावे. शशिकांत शिंदे या चर्चेत असत, स्थानिकसाठी चिन्हावर लढा असे सांगितले गेले, पण विलीनीकरणाबाबत त्यांना काही माहिती नव्हती.
हसन मुश्रीफ यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भूमिका देखील स्पष्ट केली. “अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल आमचे प्रमुख आहेत, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विमान अपघाताच्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले आणि लोकांच्या मनातील शंका दूर होणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.




















