
राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्री ठाकरे यांचा राज्याच्या कृषिमंत्र्यांकडे आग्रह

जळगाव मिरर | ८ जून २०२६
गेल्या आठवड्याभरात रावेर- यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या उभ्या केळी पिकाच्या प्रचंड नुकसानामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे व नुकसान भरपाईचे ऑनलाइन अर्ज वगैरे भानगडीत न टाकता सॅटॅलाइट सर्वेक्षणातून सरसकट जास्तीत जास्त नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी,अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी केली आहे.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना थेट मोबाईल वरून संपर्क करून भाग्यश्री ठाकरे यांनी आपल्या एकूणच जिल्ह्यात वादळी पावसामुळे उभ्या केळी पिकांच्या झालेल्या नुकसानाच्या परिस्थितीची माहिती दिली.शेतकरी प्रचंड हताश असून केळीच्या उभ्या बागांमध्ये भया व परिस्थिती असल्याची जाणीव करून देत
याबाबत जळगाव जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना सॅटॅलाइट सर्वेक्षणाचे आदेश द्यावेत आणि याच सर्वेक्षणाच्या आधारावर विमा कंपन्याना थेट नुकसान भरपाई देण्याचे आदेश काढावेत,अशी मागणी भाग्यश्री ठाकरे यांनी केली.
याबाबत बोलताना कृषिमंत्र्यांनी राज्य सरकारकडून योग्य त्या उपाययोजना सुरू असून हताश झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देण्याचे काम केले जाईल,असे आश्वस्त केले.
वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने ऑनलाइन पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांपर्यंत जाऊन मदत करावी.शेतकऱ्यांना विना विलंब मदत मिळावी म्हणून परंपरागत कागदांमध्ये न अडकता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सॅटॅलाइट सर्वे ग्राह्य मानून जास्तीत जास्त मदत मिळावी,अशी ईमेल द्वारे सुद्धा मागणी केली आहे.




















