अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्ह्यातील 27 मंडळातील 21 दिवसापेक्षा पावसाचा जास्त खंड तुटवडा झाल्यामुळे कापूस पिकाचे अॅग्रीम विमा वाटप करावे अशा आशयाचे निवेदन आज ता.29 रोजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
खरीप हंगाम 2023 मध्ये संपुर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सरासरी पर्जन्यमानापेक्षा 25 टक्के पाऊस कमी झालेला आहे. त्याचा सर्वच पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे. खरीप हंगामाचे उत्पादन 20 टक्यापेक्षा कमी आलेले आहे. जिल्हा लवकरात लवकर दुष्काळी जाहीर होणे गरजेचे असताना कुठलीच ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात 27 मंडळे ज्यात पावसाचा 21 दिवसापेक्षा जास्त खंड आहे अश्या मंडळात अँग्रीम पिक विमा वाटप लवकरात लवकर दिवाळीपूर्वीच होणे जरुरीचे होते. पंरतु पिक विमा कंपनी (ओरिएन्टल इन्शुरन्स) मुद्दाम हेतु पुरस्कर उशिर करीत आहे. व खोटे नाटे अपील करीत आहे. विमा कंपनीचे जिल्हा लेव्हलवर तसेच विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे अपील फेटाळले गेलेले आहे. विमा कंपनीला आदेश देऊन लवकरात लवकर कापूस पिकाचाअँग्रीम पिक विमा वाटप सुरु करावा. शेतक-यांना आर्थिक मदत करावी अशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या निवेदनावर काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हाकार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, अमळनेर बाजार समितीचे संचालक डॉ. अनिल नथ्थू शिंदे,श्री नितीन बापूराव पाटील,श्री शरद पांडुरंग पाटील यांच्या निवेदनावर सह्या आहेत.