जळगाव मिरर | २९ मे २०२५
गेल्या २१ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोधार्थ त्याची आई मंबईला गेली होती. परंतु त्या बेपत्ता झालेल्या अरबाज शेख (वय १६, रा. मास्टर कॉलनी) याचा मृतदेह बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समिती इमारतीच्या छतावर वायरींमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. हा युवक कबुतर पकडण्यासाठी तो घराबाहेर पडला होता. तेव्हा विजेचा धक्का लागून त्याचाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मास्टर कॉलनीत अरबाज शेख हा युवक आजी-आजोबा व आईसह वास्तव्यास होता. दि. ८ मे रोजी अरबाज हा कबुतर पकडण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. परंतू रात्री उशिरापर्यंत देखील तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अरबाजच्या आईने आसपासच्या परिसरात शोध घेतला पण तो मिळून आला नव्हता. अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेवून मुलाला कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका इमारतीवरील छतावर बुधवारी एक व्यक्ती पाण्याची टाकी तपासण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला उग्र स्वरूपाचा वास आला. तेव्हा त्याला केबलसारख्या वायरींमध्ये एक मृतदेह गुंडाळेल्या अवस्थेत दिसताच या घटनेचा उलगडा झाला. कुजलेला मृतदेह दिसल्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्यांना याबाबत कळवीले. अखेर अरबार याचे आजोबा घटनास्थळी आले. त्यांनी कुजलेला मृतदेह पाहिल्यावर त्यांनी शर्टावरून नातू अरबाज याला ओळखले.अरबाज याला कबुतर पकडण्याचा छंद होता, तो दि. ८ रोजी कबुतर पकडण्याकरीता घराबाहेर पडला होता. मात्र थेट त्याचा मृतदेह मिळून आल्याने त्याचा मृत्यू शॉक लागल्यामुळे झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.





















