जळगाव मिरर / १५ एप्रिल २०२३ ।
जळगांव येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या दर्जी फाऊंडेशनतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दर्जी फाऊंडेशनमध्ये त्यांना मानवंदना करण्यात आली. दर्जी फाऊंडेशन आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.गोपाल दर्जी यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला. माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी सतत जातिपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले.
भारतीय समाजात जातिपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भुमिका बजावली. जातीपातीच्या भेदभावाने भारतीय समाजाला संपुर्णतः विस्कळीत आणि अपंग बनविले होते त्याला पाहाता बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या हक्काची लढाई लढली आणि देशातील सामाजिक स्थितीत बर्याच प्रमाणात बदल केला. असे मत प्रा.गोपाल दर्जी यांनी आपल्या मनोगतात मांडले. कार्यक्रमातून त्यांच्या जीवनाचा संदेश विद्यार्थी मित्रांना व कार्यालयातील कर्मचार्यांना समजवून कार्यक्रमाचा शेवट झला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.ज्योती दर्जी यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी दर्जी फाऊंडेशनचे शिक्षकवृंद व विद्यार्थी मित्र यांनी सहकार्य केले.




















