जळगाव मिरर | १ जून २०२५
बारा वर्षांपुर्वी प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याचे घरात वाद झाले. त्यानंतर पती घरातून निघून गेल्यानंतर सारीका डिगंबर वाघुळदे (वय ३०, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या विवाहितेने विषारी औषध प्राशन केले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतासंना तीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. ३१ रोजी दुपारच्या सुमारास नशिराबाद येथे घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे सारिका वाघुळदे या पती व दोन मुलांसह राहत होत्या. शनिवारी दुपारी पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर मालवाहू रिक्षाचालक असलेला पती घराबाहेर निघून गेला. त्यामुळे घरी एकटीच असलेल्या सारीका यांनी संतापाच्या भरात विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार त्यांच्या शेजारच्यांच्या लक्षात येताच त्यांनी सारीका वाघुळदे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सारिका व डिगंबर यांचा १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. कौटुंबिक वादातुन सारिका वाघुळदे यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यांना दोन लहान मुले असून त्यांच्यार मातृछत्र हरपले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




















