
जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील अनेक गावात भुलाबाईचे विसर्जन सुरु असताना जळगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली होती. दि. ९ रोजी सायंकाळी एक ४२ वर्षीय व्यक्ती तलावात बुडून बेपत्ता झाला होता. त्यानंतर घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धाव घेत बेपत्ता व्यक्तीला शोध मोहीम सुरु असताना तब्बल २२ तासाने त्या इसमाचा मृत्यूदेह सापडला असून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे भुलाबाई विसर्जनासाठी काही मुली गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी रमेश चव्हाण(वय ४२) हे तलावामध्ये हे पोहत होते. पोहताना अचानक थकल्यामुळे ते बुडाले आणी बेपत्ता झाले. सोमवारी संध्याकाळी ते मिळून आले नव्हते. रात्री शोध थांबवण्यात आला. सकाळी त्यांचा मृतदेह शोधण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून सुरू करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.