जळगाव मिरर | १३ नोव्हेबर २०२३
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिवाळीची धामधूम सुरु असतना कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्ये भाऊ ओढ्याला खेकडे पकडण्यासाठी गेले असतांना शिकऱ्यांनी शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज साेमवार उघडकीस आली आहे. हि घटना काेल्हापुर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथे घडली आहे. गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या दाेन्ही भावांचा शाेध आज अखेर त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर नातेवाईकांनी थांबविला.
मिळालेल्या माहितीनुसार, वन्य प्राण्यांची तलावाच्या जवळ विजेचा शाॅक देऊन चोरटया शिकारी केल्या जातात. चोरट्या शिकारीचे बिंग फुटू नये म्हणून पाच संशयितांनी नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर मृत दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह पावनगडावरून फेकून दिले होते. पोलीस आणि गावकऱ्यांच्या शोध मोहिमेत झुडपात फेकून दिलेल्या दोघा भावांचे मृतदेह आज (साेमवार) हाती लागले. जोतिराम सदाशिव कुंभार (वय ६४) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय ६०) अशी मृत दोघा सख्या भावांची नावे आहेत. त्यांचे नातेवाईक व गावकरी गेल्या चार दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पाेलीसांनी दिली. पन्हाळा विभागाचे पाेलीस या घटनेची कसून चाैकशी करीत आहेत.