
जळगाव मिरर | ३ जून २०२६

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे एका तरुणाने विहिरीत आत्महत्या केली तर एकाने दहिवद येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील राजेंद्र श्रावण माळी (वय ३८) यांनी त्यांच्या स्वतःच्या राहत्या – घरात छताच्या लोखंडी कडीला दोरी बांधून आत्महत्या केली. दुपारी साडेबारा वाजेपासून ते दिसत नाहीत अन् फोन ही उचलत नाही म्हणून पुतण्याने त्यांच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांना काका घरीच दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाईक व मित्रांनी त्यांना खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हे. कॉ. विजय भोई करत आहेत.
तसेच जानवे येथे १ रोजी दुपारी ४ वाजता जानवे शिवारात चंद्रशेखर राजाराम पाटील यांच्या विहिरीत एक मृतदेह तरंगताना दिसत आहे, अशी माहिती पोलीस पाटील विलास पाटील यांना मिळाली. त्यानंतर विलास पाटील, विठ्ठल भील, विनोद भील, संदीप भिल यांनी खाटेच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह अमोल सुनील भील (वय २१) यांचा असल्याची ओळख पटली. तर अमोल २५ रोजी रात्री १० वाजता घरातून काही सांगता निघून गेला होता. २७ रोजी अमळनेर पोलीस ठाऱ्यात हरवल्याची नोंद केली होती. तर १ रोजी त्याचा मृतदेह पाण्यात सापडला. त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास हे. कॉ. कैलास शिंदे करत आहेत.




















