अमळनेर : विक्की उत्तम जाधव
दिनांक २३ एप्रिल २०२३ दाऊदी बोहरा समाज अमळनेर तर्फे ईद-ए-मिलनाच्या कार्यक्रम जमातखाना मध्येआयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अनेक समाजातील प्रतिष्ठित मान्यवर व अनेक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांचे समाजा तर्फे स्वागत करण्यात आले. अमळनेर शहरातील दाऊदी बोहरा समाजाचे अमील साहेब यांनी आपल्या संभाषणात सांगितले की विविधतेत एकता ही आपल्या भारत देशाची उज्वल परंपरा आहे व ती टिकून आहे आणि ती पुढेही टिकून राहील यात कोणतीही शंका नाही.
समाजाचे ५३वे धर्मगुरू डॉ. सैय्यदना मुफद्दल सैफुद्दिन साहेब (त ऊ श)यांनी समाज बांधवांना दिलेला उपदेश म्हणजे तुम्ही ज्या देशात राहतात तिथे प्रामाणिकपणे व निष्ठेने राहा आणि सलोख्याने रहा असा संदेश दिलेला आहे. आपल्या अमळनेर शहरात सुद्धा समाज बांधव सलोख्याने , बंधू भावाने आणि निष्ठेने रहात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व देशात सदैव अमन, शांतता व बंधुभाव नांदावा या करता त्यांनी प्रार्थना केली.आमदार अनिल पाटील आपल्या संभाषणात म्हणाले की मी दर वर्षी नियमितपणे ईद मिलनाच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असतो. आपले अमळनेर शहर हे शांतता प्रिय आणि जातीय सलोखा येथे जोपासला जातो हे आपल्या संत नगरीची विशेष बाब आहे व हा लौकिक महाराष्ट्रभर पसरलेला आहे याच्या आपणा सर्वांना अभिमान वाटावा असा आहे. एडवोकेट ललिताताई मॅडम यांनी आपल्या मनोगतात पवित्र रमजान महिन्याचे व इस्लाम धर्माबद्दलचे अभ्यासपूर्ण भाषण प्रस्तुत केले व उपस्थित सर्व श्रोत्यांचे मन जिंकले. दारूलउलुमचे रियाज मौलाना यांनी रमजान महिन्यात अदा करण्यात येणारी जकात व फित्रा बद्दलचे महत्त्वपूर्ण विवेचन केले.
याप्रसंगी माजी आमदार सौ स्मिताताई वाघ, माजी नगराध्यक्ष सौ जयश्री पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी, खा.शी.चे संचालक डॉ.अनिल शिंदे, एडवोकेट विंचुरकर, एडवोकेट महेश बागुल,विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड श्याम पाटील,रोटरी क्लब अमळनेरचे सुहास राणे ,चेलाराम सैनानी ,डॉ. अनिल वाणी, डॉ.शरद बाविस्कर ,अभिजीत भांडारकर, महेश पाटील, सुबोध पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विजय शुक्ल व सुनील वाघ , ग्राहक फाउंडेशनचे हेमंत दादा भंडारकर ,एम एस ई बी चे इंजिनिअर उज्ज्वल पाटील, नगरसेवक मनोज पाटील, मुन्नाभाऊ शर्मा, राजू चौधरी, बाळा संनदाशिव, पंकज चौधरी, न. पा. प्रशासन अधिकारी संजय चौधरी, सोमनाथ संनदाशिव , पत्रकार चेतन राजपूत, किरण पाटील, श्रीमती जयश्री साळुंखे व राजश्री पाटील, सौ भैरवी पलांडे तर मुस्लिम समाजातर्फे नावेद शेख, मकसूद मिस्त्री, रफिक तेली, राजू भाई, फारुख भाई,फैयाज सर इक्बाल भाई,एहतेशाम भाई, डॉ रईस बागवान, नावीद भाई, बोहरा समाजामध्ये तर्फे व्हॉइस प्रेसिडेंटशेख एहसान भाई बुरहानी, सेक्रेटरी शेख मोहम्मद भाई करमपुरवाला ट्रेझरर शेख अलीहुसेन भाई सैफी व समस्त कार्यकारी मंडळ उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होणे करिता बुरहानी गार्ड्स इंटरनॅशनल कॅप्टन ताहा बुकवाला, व्हाईस कॅप्टन अजिज बोहरी,हुसेन बोहरी,अब्दुल कादीर जावेद, हुसेन सैफी,हुजेफा ईज्जी,अब्दुलकादीर भाई, मुस्तफा भाई, आलीअजगर बोहरी,शब्बीर हुसेन,अलीअजगर अलाबक्ष आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मकसूद बोहरी यांनी केले अशी माहिती अहमद बुर्हानी कळवितात.