जळगाव मिरर | १० जुलै २०२६
भारतीय सैन्य दलात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोशन करिअर अकॅडेमी – मोशन जळगावतर्फे एक विशेष आणि अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. दहावीनंतर NDA ची तयारी करणाऱ्या तसेच संरक्षण दलात उज्ज्वल करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे सत्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

*रविवार, दि. १२ जुलै रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत मोशन जळगाव, भास्कर मार्केट, जळगाव येथे* निवृत्त *कर्नल सारंग काशीकर* यांच्या प्रमुख उपस्थितीत हे चार तासांचे विशेष मार्गदर्शन सत्र पार पडणार आहे.
या सत्रामध्ये NDA परीक्षेसाठी दोन वर्षांचे प्रभावी नियोजन, इंग्रजी संभाषण कौशल्य (English Speaking), व्यक्तिमत्त्व विकास, Service Selection Board (SSB) मुलाखतीची तयारी, अधिकारी म्हणून आवश्यक नेतृत्वगुण तसेच संरक्षण दलातील करिअरच्या विविध संधी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, *हे मार्गदर्शन पूर्णपणे विनामूल्य* असून जळगाव व परिसरातील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोशन जळगावच्या संचालकांनी केले आहे.
दरम्यान, *२०२६ मध्ये JEE, MHT-CET तसेच फाउंडेशन (इयत्ता ६ वी ते १० वी)* परीक्षांमध्ये दमदार व सर्वोत्तम निकाल देत मोशन जळगावने पुन्हा एकदा गुणवत्तेचा नवा मापदंड निर्माण केला आहे. याच यशाच्या बळावर यावर्षी प्रथमच *JEE + NDA Integrated Program* ची सुरुवात करण्यात आली असून विद्यार्थी आणि पालकांकडून या अभ्यासक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या अभ्यासक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे *NDA लेखी परीक्षेची तयारी, JEE Main चे मार्गदर्शन, SSB मुलाखत प्रशिक्षण, इंग्रजी संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास तसेच ग्राउंड व फिजिकल ट्रेनिंग* या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना *एकाच छताखाली* उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे संरक्षण दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोशन जळगाव हा विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक पर्याय ठरत आहे.
NDA मध्ये यश मिळविण्यासाठी योग्य दिशा, नियोजन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने *रविवार, दि. १२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मोशन जळगाव, भास्कर मार्केट* येथे आयोजित या विशेष मार्गदर्शन सत्राला उपस्थित राहून आपल्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.





















